नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. उत्तराखंडमध्ये नव्याने जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे रात्रीच्या तापमानात घट झाली.

काश्मीर खोऱ्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरून होणारी हवाई वाहतुकही प्रभावित झाली. कमी दृश्यमानता आणि सततच्या बर्फवृष्टीमुळे कालही या विमानतळावरून ये-जा करणारी उड्डाणं रद्द करण्यात आल्याचं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं.