नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही आरोपींच्या मृतदेहाचं पुन्हा शवविच्छेदन करायचे निर्देश, तेलंगणा उच्च न्यायालयानं दिले. पुनर्शव-विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यायचे निर्देशही न्यायालयानं दिले.

या प्रकरणासंबंधांतल्या दोन याचिकांवरची सुनावणीही आज झाली, या याचिकांद्वारे 6 ऑक्टोबरला झालेल्या चकमकीच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं आखलेल्या सूचनांचं पालन पोलीसांनी केलं आहे किंवा नाही, हे पडताळून पाहायचं असल्याचं खंडपीठाचे प्रमुख न्यायमूर्ती, आर.एस. चौहान यांनी म्हटलं आहे.